Home चंद्रपुर जिल्हा विशेष गावात प्रवेश करीत वाघाने केला गोठ्यातील २ गायी व १ गोरा ठार

गावात प्रवेश करीत वाघाने केला गोठ्यातील २ गायी व १ गोरा ठार

1282

शिवणी गावातील नागरिक वाघाच्या दहशतीत.

वाघाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

सिंदेवाही : ताडोबा बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रातीलच शिवणी गावात 16 डिसेंबरला रात्री दोन वाजताच्या दरम्यान वाघाने गावात घुसून मोहन आदे यांच्या स्वतःच्या मालकीच्या गोठ्यात दोन गाई व एक गोरा बांधलेला असताना त्यांना जागीच ठार केले असल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शिवणी गावातील नागरिकांना वाघाची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. वनविभागाने तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

.         ताडोबा बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात अनेक गावात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. या क्षेत्रातील सिरकाडा सफारी गेट वरून देशातील अनेक पर्यटक वाघाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवणी वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ सुरू असतानाच शिवणी येथील मोहन आदे यांचे घराला लागून असलेल्या गोठ्यात वाघाने एकाच व्यक्तीच्या दोन गायी, एक गोरा ठार केल्याने आदे या गरीब शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान गोठ्याच्या बाजूला सलीम पठाण यांचे घर असल्याने त्यांना वाघाचा आवाज ऐकू आला. मात्र थंडीचे दिवस असल्याने आणि वाघाची प्रचंड दहशत असल्याने सलीम पठाण यांनी घरातच राहणे पसंत केले आहे. असे सलीम पठाण यांनी माध्यमांकडे सांगितले आहे. शिवणी वनपरिक्षेत्रात अनेक गावात वाघाचा धुमाकूळ दररोज सुरू असून नागरिक वाघाच्या दहशतीत जगत आहेत. त्यातच वनपरिक्षेत्राच्या काही अंतरावर असलेल्या मोहन आदे यांच्या दोन गाई व एक गोरा वाघाने फस्त केला असल्याची माहिती सकाळी नागरिकांना माहीत होताच परिसरात एकच भीती निर्माण झाली.

.      गावकऱ्यांनी गोठ्याच्या दिशेने धाव घेतली त्यात गोठ्यामध्ये दोन गायी, एक गोरा फस्त झालेले आढळले. तर बाजूला शेती असल्यामुळे वाघाच्या पाऊलखुणा सुद्धा लोकांना दिसल्या. त्यामुळे वार्डात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत सकाळी १७ डिसेंबरला ही माहिती वन विभागाला देण्यात आली व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी जावून पंचनामा केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मोहन आदे यांच्या घरातील सर्व जनावरे वाघाने फस्त केल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे तसेच गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच मोहन आदे यांची भयंकर नुकसान झाले असल्याने त्यांना तत्काळ आर्थिक मोबदला देण्यात यावा. अशी मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली. वाघाच्या दहशतीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून वाघ कधीही गावात येऊ शकते, त्यामुळे वाघाला पिंजऱ्यात पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!