- तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला
- नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना
नागभीड : कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची व दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडविणारी घटना नागभीड तालुक्यातील मौशी या गावात घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. पत्नी अल्का तलमले (40), मोठी मुलगी प्रणाली तलमले (20), लहान मुलगी तेजस्विनी तलमले (18) असे मृतांची नावे आहेत. यामध्ये मुलगा अनिकेत बचावला आहे. संशयीत आरोपी पती अंबादास लक्ष्मण तलमले (50) याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.![]()
. नागभीड पासून 15 किमी अंतरावर असलेल्या मौशी येथे अंबादास आपल्या कुटुंबासह राहत आहे. पत्नी अल्का, मोठी मुलगी प्रणाली, लहान मुलगी तेजस्विनी व मुलगा अनिकेत असे त्याचे कुटुंब होते. अंबादास व त्याची पत्नी अल्का शेत मजुरीचे काम करीत होते. आज (रविवार ) ला पहाटेच्या सुमारास मुलगा अनिकेत गावातीलच एका हॉटेलात कामाकरिता गेला. यावेळी पत्नी व मुली झोपेत होत्या. मुलगा कामाकरिता बाहेर गेल्याची संधी साधून आज पहाटे 5 च्या सुमारास अंबादासने एका पाठोपाठ एक पत्नी अल्का मुलगी प्रणाली व तेजस्विनी या तिघांवर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिघांची हत्या केल्याचे समजते.![]()
. सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. संशयित आरोपी अंबादास तलमले याला पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करीत आहेत. हत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे
“आरोपी अंबादास हा दोन -तीन महिन्यांपासून उशाशी कुऱ्हाड घेऊन झोपत होता. गावात दारू पिऊन धिंगाणा घालीत होता. तसेच गावातील शेजाररच्या एका व्यक्तीचे घरातील टीव्ही व आलमारीची तोडफोड केली असल्याचे गावाकऱ्यांनी सांगितले.”


