सिंदेवाही : सामाजिक आणि राजकीय चळवळीतील अग्रगण्य व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील ग्राम पंचायतचे माजी सरपंच वामनराव खोब्रागडे यांचे मंगळवारी सायंकाळी २ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांचे प्रेतावर विरव्हा येथील उमानदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. मृत्यू समयी ते ५८ वर्षाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी आणि एक मुलगी असून त्यांचे कुटुंबावर अवकळा पसरली आहे.


