कमिशन द्या नाहीतर प्रकल्प थांबवा असं मविआ सरकारचं धोरण

41
  • कडू कारले तुपात तरले, साखरेत घोरले तरी कडू ते कडूच 
  •  प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाविकास आघाडी वर कडाडून टीका .

चंद्रपूर

.             चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढतो आहे, तसंच राजकीय वातावरणही तापतं आहे. मात्र तुमचा जोश, उत्साह अजिबात कमी झालेला नाही. या वेळी चंद्रपूरने ठरवलं आहे फिर एक बार ४०० पारचा नाराही त्यांनी बोलून दाखवित महाविकास आघाडीच धोरण म्हणजे “कमिशन द्या नाहीतर प्रकल्प थांबवा असं असल्याची कडाडून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात आयोजित प्रचारसभे दरम्यान केली. ते सोमवारी मोरवा येथे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व गडचिरोली लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारसभेचा नारळ चंद्रपूरातून फोडला.

..            पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की २०२४ लोकसभा निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा आहे. एकीकडे भाजपा आणि एनडीए आहे. भाजपा आणि एनडीए देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेते आहे. दुसरीकडे आहे काँग्रेस आणि त्यांची इंडी आघाडी. सत्ता भोगा आणि मलाई खा हे त्यांचं ध्येय आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक असतं हे महाराष्ट्राशिवाय आणखी कुणाला जास्त समजणार. जोपर्यंत देशात त्यांचं सरकार होतं, महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली असा आरोप नरेंद्र मोदींनी केला. यावेळी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.राम मंदिराच्या निर्मितीसाठी चंद्रपूर ने लाकडं पाठवली. संसदेच्या नव्या इमारतीतही चंद्रपूरचीच लाकडं आहेत असाही उल्लेख यावेळी त्यांनी केला

..                  पुढे बोलतांना ते म्हणाले ठाकरे सरकारने महाराष्ट्रातली सत्ताही मिळवली तेव्हाही त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबांचा विकास केला. कोणाचा किती हिस्सा कुठला ठेका कुणाला, मलाईदार खाती कुणाला द्यायची याचमध्ये महाराष्ट्राचा विकास त्यांनी पणाला लावला. महाराष्ट्राच्या विकासाचा प्रकल्प आला की कमिशन हे मागायचे. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसिंचन योजना ठप्प केली. विदर्भाच्या विकासासाठी जो समृद्धी महामार्ग सुरु केला त्याचाही विरोध केला. कोकणात रिफायनरी प्रकल्पही रोखला. मुंबई मेट्रोचं कामही त्यांनी रोखलं होतं. गरीबांना घरं देणंही बंद केलं होतं. कमिशन द्या नाहीतर कामात खोडा घाला हेच यांचं लक्ष्य होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आपण वेगाने काम करतो आहोत. नियत चांगली असली की निकालही चांगले लागतात हे आपण पाहतोच आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या प्रचार सभे दरम्यान बोलत होते.

.          यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हंसराज अहिर, चंद्रपूर- आर्णी लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, चिमूर- गडचिरोली लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांनी ही सभेला संबोधले.

संबोधित करतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मी शाही घराण्यातून आलेलो नाही

.        मी कुठल्याही शाही घराण्यातून आलेलो नाही. तुम्हीच मला इथवर आणलं आहेत. ज्या लोकांकडे घरं नव्हती असे लोक दलित, वंचित, आदिवासी होते. त्यांच्याकडे पिण्याचं पाणी नव्हतं. रस्ते, शिक्षण, सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे मोदींनी गॅरंटी दिली होती की आमचं सरकार दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबाचं आयुष्य बदलण्यासाठी काम करणार. आम्ही ते काम करुन दाखवलं, खूप मेहनत घेतली आणि चार कोटी लोकांना घरं मिळवून दिली, हे सगळे याच वर्गांमधले लोक आहेत. उज्ज्वला सिलिंडर योजना मिळालेलेही लोक हेच आहेत असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

  • गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

उद्यापासून गुढीपाडवा नवं पर्व सुरु होतं आहे. सगळ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अश्या शुभेच्छा नरेंद्र मोदी यांनी मराठीतून दिल्याने यावेळी मोदी जिंदाबाद चे नारे देत जल्लोष साजरा केला.