आला रे आला पाऊस आला

31

चंद्रपूर : ७ जुन पासून मृग नक्षत्राला सुरुवात होते. खरं तर या दिवशी हमखास पावसाला सुरुवात होते मात्र पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे टोबणे, पेरणे राहून गेले. 15 दिवसापासून गायब असलेल्या पावसाने आता जिल्ह्यांत हजेरी लावण्यात सुरुवात केली आहे. दि. 18 ला सायंकाळी 6 वाजता पासून, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय पेरणीसाठी पावसाची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे.