Home चंद्रपुर जिल्हा विशेष गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत तडजोड करणार नाही

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत तडजोड करणार नाही

1115

अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार

नेरी : येथील पिएचसी चौकातील अतिक्रमण हटवून ग्रामपंचायत प्रशासन स्तब्ध बसणार नाही आता बाजार चौकासोबत अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण हटविणार आहे. विकासाला चालना देण्यासाठी तसेच गावातील रस्ते नाल्या यांचा विकास करण्यासाठी रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविणार असून अतिक्रमणाबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचे ग्राप प्रशासना कडून सांगितले जात आहे.

.      मागील कित्येक दिवसांपासून नेरी गाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून अनेकांनी अतिक्रमण केले असून यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रकामांत पाहाव्या लागत आहे. त्याच सोबत नवीन बांधकाम किंवा विकासासाठी अडथळे निर्माण झाले असून एकाच व्यक्ती कडे दोनदोन दुकान गाळे आहेत यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्यांना कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण हटविणार असल्याचे ग्रा प प्रशासनाने माहिती दिली असून याबाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही असे प्रस्तुत प्रतिनिधी बोलताना सांगितले आहे.

error: Content is protected !!