परळी : देशामध्ये आर एस एस च्या विचारधारेचे भारतीय जनता पार्टी च्या सरकारने गेली दहा वर्षापासून वेगवेगळे खोटे आश्वासने देऊन जनतेला मूर्ख बनवून हुकुमशाही सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी दाखवून देशातल्या जनतेला पेट्रोल डिझेल गॅस विविध जीवनावश्यक वस्तू, खते बी बियाणे कीटकनाशके औषधी व विविध उद्योग कारखान्यावरील उत्पादक सर्व वस्तूवर जीएसटी कर लावून जनतेची आर्थिक लूट करून उद्योगपतीला कर्ज माफ केले, देशात महागाईचा माध्यमातून जनतेची लूट केली जात असून विरोधात असणाऱ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यावर सीबीआय, ईडी, एसीबी धाडी टाकून तडजोडी करून प्रेस मीडियाच्या माध्यमातून सर्व देशातील जनतेला वेठीस धरण्याचा कार्यक्रम सत्ताधारी राबवित असुन संविधान ने जनतेला दिलेला मतदानाचा अधिकार इंडिया आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या तुतारी फुकणारा माणूस या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आरएसएस विचारधारेचे बीजेपी सरकारला मतदारांनी तडीपार करावे. आपल्या देशामध्ये शेतकऱ्याचा माल तयार झाल्यानंतर बाजारपेठ आल्यावर केंद्र सरकारने परदेशातून शेतीमाल आयात करून बाजारपेठेतील सर्व शेतकऱ्यांचे शेतीमालाच्या भावाचे अवमूलन झाले त्यामुळे शेतकरी चारी बाजूने संकटात सापडल्या असून शेतीमाल निर्यात करण्यावरही वेगवेगळ्या अटी टाकून बंधने लादल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला व त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय आणि कर्जबाजारी झालेल्या आहे. अकार्यक्षम केंद्र सरकार मुळे शेतकऱ्यावर वाईट दिवस आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.
. शेतकरी व्यापारी युवक महिला कामगार सुशिक्षित बेकार अल्पसंख्यांक आदिवासी गोरगरीब जनतेचे सर्व स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी, बीड जिल्ह्यातील राजकीय दहशत संपवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे निशाणी तुतारी फुकणाऱ्या माणसाला प्रचंड मताने निवडून देण्याचे आव्हानओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.


