बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम  मुदत 31 जुलैपर्यंत

50

चंद्रपूर  : केंद्र  शासनाच्या महिला व बाल विकास  विभागामार्फत  बालशक्ती  पुरस्कार दिला जातो.  प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार हा 5 ते 18 वर्षापर्यंत शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे, अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार  2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत.

.     ज्या मुलांचे वय 5पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी /जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज संस्था,  शैक्षणिक संस्था इ.अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत आहे, असे महिला व बालविकास आयुक्त यांनी कळविले आहे.