Home विशेष महाएल्गार आंदोलनासाठी वरोरा भद्रावती तालुक्यातील हजारो शेतकरी नागपुकडे रवाना

महाएल्गार आंदोलनासाठी वरोरा भद्रावती तालुक्यातील हजारो शेतकरी नागपुकडे रवाना

558

शेतकरी नेते किशोर डुकरे यांचे नेतृत्व

बच्चू कडू यांचा नागपुरात महाएल्गार

वरोरा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे ‘महाएल्गार’ आंदोलन होणार आहे. कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे मानधन, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनासाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती तालुक्यातील हजारोच्या संख्येने शेतकरी नागपूर कडे रवाना झाले आहे.

.    किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टेमुर्डा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. हे विशेष. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, शेतकऱ्यांना ना कर्जमाफी मिळाली आहे, ना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात – निर्यात धोरणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव कोसळले आहेत, तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव ५३३५ रुपये असतानाही शेतकऱ्यांना केवळ 1509 ते ३००० रुपये प्रति क्विंटलने विक्री करावी लागत आहे. “हा कोणता आत्मनिर्भर भारत?” असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलकांसाठी लागणाऱ्या अन्नधान्याची व्यवस्था काही प्रमाणात का असोना किशोर डुकरे यांच्या कडून करण्यात आली आहे.

.       यावेळी, शेतकऱ्यांसोबत प्रहार चे तालुका अध्यक्ष अमोल काटकर, गणेश उराडे, अमित बहादूरे, अक्षय बोण्डगुलवार अमोल दातारकर, राकेश भुतकर, कैलास घेगारे, तुषार बलखंडे तसेच तालुक्यातील प्रहार सेवक माजी पदाधिकारी मोठा संख्येने महाएल्गार मोर्चात सहभागी झाले आहे.

error: Content is protected !!