सरस्वती ज्ञान मंदिर शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप
नागभीड : २१ वे शतक हे स्पर्धचे असुन प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्याने त्यात स्वतः ला सिद्ध करण्यासाठी प्राथमिक शिक्षण घेत असताना आपला ज्ञानाचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे , तसेच आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर कठोर परिश्रम करणे फार आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी गुणात्मकतेला जितके महत्व देतो तितकेच महत्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले आई वडील,शाळा,शिक्षक यांचे नाव मोठे केले पाहिजे , हिच खरी त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा असते. शाळेत मिळालेल्या गुणात्मक, संस्कारमय व बौद्धिक शिदोरीचा वापर करून आपण जीवनात यश प्राप्त केले पाहिजे तसेच शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त करीत यशाच्या शिखरावर पोहचत असताना ज्या समाजाच्या माध्यमातून मी पुढे आलोय त्या बद्दल सामाजिक भान जपणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिर च्या वर्ग सातवीच्या विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले.
. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे, सहा.शिक्षिका किरण वाडीकर, आशा राजुरकर सहा.शिक्षक आशिष गोंडाने, पराग भानारकर,सतीश जिवतोडे,मेघा राऊत,पूजा जिवतोडे,श्रद्धा वाढई यांची उपस्थिती होती.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पानसे यांनी केले. इयत्ता पाचवी व सहावीच्या वतीने विविध गीत व नृत्याच्या माध्यमातून निरोप देण्यात आला तर सातवीच्या विद्यार्थ्यायाकडून समूह नृत्य व फॅशन शो च्या माध्यमातून उपस्थित सर्वांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीची विदयार्थिनी ग्रेसी मेश्राम हिने केले तर आभार पराग भानारकर यांनी मानले.


