चंद्रपूर : मागील काही दिवसापासून वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी बिन बादल बरसात तर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायबच झाली होती. परिणामी वातावरणाच्या बदलामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक घरी रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. तर तूर पिकांवर सुद्धा ढगाळ वातावरणाचा परिणाम जाणवत असून फुलावर आलेल्या तुरीवर अळी ने आक्रमक केले आहे. आता मंगळवार पासून थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.


