नेरी : शेतीचा हंगाम सुरू झाला की बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सक्रिय होतात शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात मात्र या हंगामात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाऊ नये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने अशा विक्रेत्यावर करडी नजर ठेवली आहे.
. बोगस बियाणे व बोगस खतांची विक्री होऊ नये यासाठी तालुका कृषी अधिकारी डी ए तिखे, व्ही के शेंडे, व्ही जे रामटेके, कृषी सहाय्यक येसनकर, अमित रंदये या पथकाने चिमूर तालुक्यातील चिमूर नेरी शंकरपूर खडसंगी येथील विविध कृषी केंद्रांना भेट देऊन झाडाझडती घेतली यावेळी बियाणे कीटकनाशके व खताची तपासणी करण्यात आली
तालुक्यातील परवानाधारक कृषी सेवा केंद्रांची तालुका भरारी पथकाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
बोगस बियाणे प्रकरणी कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द केले जाणार आहेत त्यामुळे बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी बियाणे साधारणता चार ते सात दिवसात उगवते यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे बियाणे खरेदी करताना दुकानदारांकडून पक्की पावती घ्यावी पेरणीनंतर टॅगवर नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा उगवण कमी आढळल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे नमुन्याची तपासणी करण्यासाठी तक्रार करावी.
तालुक्यातील परवानाधारक कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे यात कोणी बोगस बियाणे विक्री करताना किंवा या संदर्भात तक्रार केल्यास कारवाई केली जाईल. डी. ए. तीखे, तालुका कृषी अधिकारी चिमूर