दुष्टचक्र संपता संपेना ! नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच

40

.           वरोरा – चिमुर महामार्गाचे काम गेल्या ७ वर्षांपासून सुरू आहे . ठीक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक आणि प्रवाशांना धडकीच भरत आहे. दररोज या महामार्गावर अपघात घडत आहे. तर अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. खोदकाम करून ठेवलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक किंवा रिप्लेक्टर सुद्धा लावल्या गेले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहन धारक थेट खड्ड्यात पडून अपघात घडत आहे. या मार्गाने दररोज ये जा करणार्‍या नागरिकांना पाठीच्या कण्यासह विविध प्रकारच्या दुखण्याच्या आजाराने ग्रासले आहे. असे असतांनाही दुष्टचक्र थांबण्याचे काही नाव घेत नाही.

(छायाचित्र – मनोज कसारे)