Home सामाजिक सामाजिक समतेच्या दिशेने क्रांतीकारी पाऊल

सामाजिक समतेच्या दिशेने क्रांतीकारी पाऊल

888

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहे. हा निर्णय सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले क्रांतीकारी पाऊल आहे, या शब्दात आ. मुनगंटीवार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

.       जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे वंचित घटकांच्या न्याय हक्कांना बळ मिळेल, योजनांचा योग्य लाभ मिळेल. सर्व जातींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना उपयोगी ठरेल. या जनगणनेमुळे समतेच्या मूलभूत मूल्यांची भक्कम पायाभरणी निश्चित होईल, असा ठाम विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

.     आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जातनिहाय जनगणनेमुळे देशात सामाजिक न्यायाची द्वारे खुले होतील. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. यामुळे सर्व समाज घटकांसाठी अधिक प्रभावी योजना आखता येणार आहे.

error: Content is protected !!