386 ग्रामपंचायती वर महिलाराज
चंद्रपूर : जिल्ह्यातील 824 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण (दि. 23) बुधवारी जाहीर झाले. या ग्रामपंचायतींची 2025 ते 2030 अशा पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार आहे. आरक्षण सोडतीमुळे ‘काही ठिकाणी खुशी, तर काही ठिकाणी गम’ दिसून येत आहे. यातील सुमारे 386 ग्रामपंचायती वर महिला राज येणार असल्याने अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
. जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती ८२४ आहे बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती ७४२ आहेत. यात अनुसूचित क्षेत्र
८२, अनुसूचित जाती १०५, अनु. जाती महिला ५७, अनु. जमाती १५६,अनु. जमाती महिला ८१, नामाप्र १०८, नामाप्र महिला ५७, खुला प्रवर्ग सर्वसाधारण ३७३, खुला प्रवर्ग सर्वसाधारण महिला १९१ असे आरक्षण आहे.


