Home सामाजिक मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कार्यामुळे आदीवासीत नवचैतन्य

मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कार्यामुळे आदीवासीत नवचैतन्य

1139

सिंदेवाही : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी मंत्री पदाचे सूत्र हाती घेताच आदिवासी समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्याची पूर्तता करण्याचा झंझावात सुरू केला असल्याने डॉ .अशोक उईके यांच्या कार्याची प्रशंसा करीत आदिवासी समाजात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

.      आदिवासी विभाग अंतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रम शाळा कार्यरत आहेत. वस्तीगृह आणि आश्रम शाळा आदिवासी साठी  असलेल्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके आहेत.

.      त्यांच्या संकल्पनेतून ” संवाद चिमुकल्याशी”  हे अभियान राबविण्यात येत आहे. 7 फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास विभागातील कार्यरत अधिकारी कर्मचारी आश्रम शाळा वस्तीगृह मुक्कामी राहणार आहे. मुलींच्या आश्रम शाळेतील महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. भौतिक सुविधा शालेय व्यवस्थापन प्रत्येक बाबीकडे लक्ष वेदल्या जाणार आहे. आश्रम शाळेत वस्तीगृहात विशाखा समिती स्थापन केली आहे काय ? याबाबत जाणून येणार आहे .

.      प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिरसा भवनांची निर्मिती आदिवासी रूढी परंपरा संस्कृती जतन करण्यासाठी. समस्त जमातीमध्ये एकता, एकात्मता निर्माण करण्यासाठी जिल्हात बिरसा भवन हा निर्णय समाजाकरिता एकतेचा मंत्र देणारा आहे. महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती जमाती साठी एकत्रपणे राज्य आयोग आहे. परंतु या आयोगाकडे असलेल्या विविध जबाबदाऱ्या कर्तव्यासह न्यायालय  स्तरावरील कामकाजामुळे आदिवासींची अनेक प्रश्न प्रलंबित विविध समस्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आदिवासी साठी स्वतंत्र राज्य आयोग स्थापन करण्याचे प्रा. डॉ अशोक जी उईके आदिवासी विकास मंत्री करण्याचे ठरविले त्यामुळे समस्त आदिवासी बांधवांना न्याय मिळेल आणि त्यांचे प्रश्न सुटतील. आदिवासीच्या स्थलांतर विद्यार्थ्यांसाठी रोजगार सबलीकरण पारधी पॅकेज, शबरी घरकुल योजना या विषयाकडे विशेष लक्ष वेधणार आहेत. मंत्री महोदय त्यामुळे आदिवासीचा सर्वांगीण विकास साधल्या जाईल आदिवासी समाजात मंत्री महोदयाच्या कार्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे जाणवत आहे. यांच्या या  निर्णयाचे स्वागत ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख भाजपा अनुसूचित मोर्चा  कैलास कुंभरे ,  अरुण मडावी जिल्हाध्यक्ष मोर्चा. संतोष पेदोर अध्यक्ष जनसेवा बहुउद्देशीयआदिवासी संस्था नकोडा , प्रकाश गेडाम जिल्हा भाजपा महामंत्री गडचिरोली. ऍड .हरीश गेडाम माजी जिल्हा परिषद सदस्य.  प्रमोद कोळापे महामंत्री चंद्रपूर मोर्चा. मुकेश गेडाम नाट्य कलावंत. मधुकर मडावी माजी. सभापती पंचायत समिती , जयंत नैताम, निखिल कोवे, विजय सोयाम, वसंत शिडाम, माणिक पेंदाम,अक्षय मडावी  कृष्णा मडावी. लक्ष्मण सोयाम.  कुणाल मडावी प्रकाश कुंभरे, अक्षय उईके, लीना पेंदाम माजी जि. प.सदस्य वर्षा सुरपाम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे

error: Content is protected !!