विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0 नोव्हेंबर रोजी होत आहे. लोकशाहीच्या महापर्वाची जनजागृती केली जात आहे. एक मत, एक मूल्य राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. मतदारांनी निर्भयपणे मताधिकार पार पाडण्याचा संकल्प करावा. यासाठी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व्होट म्हणजे मतदान करण्याच्या अनुषंगाने मानवी साखळी निर्माण करून शाळेच्या प्रांगणात जनजागृती केली.


