प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील वास्तव
आनलाईन त्रुटीमुळे खरिप हंगामाचे प्रकरणे रखडले
चंद्रपूर/विसापूर : माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ चा नारा दिला होता. यातून शेतकऱ्यांना मोठा आत्मसन्मान प्राप्त झाला होता. देशाच्या सिमाचे, ज्या प्रमाणे जवानांना संरक्षण करावे लागते. त्या प्रमाणे अन्नदाता देखील महत्वाचे आहे. हेच यातून अधोरेखित होत होते. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना निसर्गाच्या दृष्टचक्रातून दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, ऑनलाईन त्रुटीमुळे खरिप हंगामाचे प्रकरणे मोठ्याने रखडले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार ९५ शेतकऱ्यांना पिक विमा योजनेपासून वंचित राहण्याचे वास्तव समोर आले आहे.
. शेतकऱ्यांना कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टीमुळे बेजार होतो. शेतातील नापिकी त्याच्या पाचवीलाच आहे. नैसर्गिक आपत्ती मधून त्याची सुटकाच होत नाही. या शिवाय सरकारी अनास्थेमुळे तो अधिकच हतबल झाला आहे. शेतमालाचे पडलेले भाव हा शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसागणिक उजागर होत आहे. यामधून सावरण्यासाठी व त्याच्या ह्रदयावर घावावर मलमपट्टी म्हणून सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना आणली. मात्र, या योजनेत देखील बळीराजाचा पूर्णपणे समावेश नाही, हे वास्तव चिंता करणारे आहे.
. जून ते सप्टेंबर हे चार महिने शेतकऱ्यांचा खरिप हंगामाचे आहेत.२0२४ खरिप हंगामात पीएमएफबीवाय या पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विभागाने पिक विमा योजना अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले. ही आनलाईन प्रकिया करताना जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांच्या पिक विमा योजनेत त्रुटीमुळे खरिप हंगामाचे पिक विमा संरक्षण मिळने कठीण झाले आहे.शेतकऱ्यांनी त्रुटीची पुर्तता २0 सप्टेंबर २०२४ पर्यंत करण्याचा फतवा जिल्हा प्रशासनाने काढला आहे. मात्र,अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आनलाईन जटिल प्रकिया पूर्ण केली नाही. परिणामी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम २0२४ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ४५ हजारांवर शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय वंचित शेतकरी शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण मिळावे.यातून त्यांना दिलासा मिळावा, म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत खालील तालुक्यातील शेतकऱ्यांचे त्रुटीमुळे खरिप हंगामाचे पिक विमा प्रकरणे रखडले आहे.
तालुका त्रुटीमुळे प्रलंबित प्रकरणे बल्लारपूर – १२९६ भद्रावती – ६२3४ ब्रम्हपुरी – ४४४२ चंद्रपूर – २3८९ चिमूर -८४८७ गोंडपिपरी – 3२30 जिवती – 3४९९ कोरपना – 3८४७ मूल – ५६६ नागभीड – ६४१ पोंभुर्णा – ११६१ राजुरा – २१८0 सावली – ६3२ सिंदेवाही – ४४६ वरोरा – ६0४५ एकूण – ४५0९५