युवकांनी पुढील आयुष्यात देशसेवा करावी : नयोमी साटम

20

वरोरा : देशाच्या सीमेवर भारतीय जवान कणखरपणे उभे असल्यामुळेच आपण समाधानाने जीवन जगत आहो. त्यामुळे जवानांच्या शौर्याचा आपणास आदर असला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात जे काही बनाल, त्यातून देशसेवा कशी करता येईल, याचा विचार युवक-युवतींनी करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी केले. त्या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

.         जिल्हा पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, स्थानिक माजी सैनिक संघ, एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर, स्वर्गीय मोरेश्वरराव टेमुडें चॅरिटेबल ट्रस्ट, बेस्ट सेक्युरिटी एजन्सी वरोरा व पैगाम साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी येथील शहीद योगेश डाहुले चौकात कारगिल युद्धात वीरगती पत्करून आपल्याला विजय मिळवून देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्याकरिता कारगिल विजय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.         सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, रिटायर्ड सेवानिवृत्त कॅप्टन वामन निब्रड, एअर बोर्न सेंटरचे अध्यक्ष अमन टेमुर्डे, शहीद योगेश डाहूले यांचे माता-पिता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी शहीद योगेश डाहुले चौकातून रॅली काढण्यात आली. यानंतर नयोमी साटम, माजी सैनिक व नागरिकांनी शहिदांच्या स्मारकावर आपली आदरांजली वाहिली. रॅलीत शहरातील सर्वच शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी सहभागी झाले होते. वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेले दिगंबर खापणे यांनी प्रास्ताविक केले. वैभव निमकर यांनी कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मानले. योगेश डाहूले चौकातील हा कारगिल विजय दिवस येथील उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.