आज महाराष्ट्र राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला मात्र हा अर्थसंकल्प केवळ केंद्रावर स्तुतीसुमने उधळण्याचा एक प्रयत्न असल्याची टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या अर्थसंकल्पात, अर्थसंकल्पातील तरतुदी कमी व मोदींची स्तुती जास्त असा हा अर्थसंकल्प दिसून येत आहे. समोरच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला फसविण्याचा महायुतीचा डाव यातून दिसून येत आहे. बेरोजगारी शेतकरी, महिला याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.

