तब्बल 43 दिवसानंतर वडिलांच्या मृत्यूने त्यांचा शोध संपला

28

कुंभमेळाव्यात गेले होते बाप-लेक

अखेर त्याच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण गाव हळहळले

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील मोटेगाव येथील मोरेश्वर आनंदराव सोनवाने (45)आणि त्यांचा मुलगा सागर मोरेश्वर सोनवाने (11) हे दोघे बाप लेक दि 24 फरवरीला प्रयागराज महाकुंभ येथे शाही स्नान करण्यासाठी गोंदिया वरून रेल्वे ने निघाले आणि त्यांच्या जीवनाच्या करून कहाणीला सुरवात झाली. नियतीने येथूनच डाव साधित मोरेश्वर यांच्या जीवनाची थट्टा उडविली जबलपूर समोर अज्ञात चोरट्यांनी बॅग जबदस्तीने चोरून नेली. सर्व पैसे कपडे सर्वकाही चोरांनी चोरले कसे तरी ते प्रयागराज येथे पोहचले आणि गंगा नदीवर स्नान करून दुसऱ्या तीरावर पोहचले असता पैशाच्या विवंचनेत मोरेश्वर असताना मुलगा सागर याच्या कानातील बारी विकून प्रपंच सुरू केला. मात्र तेही पैसे संपले आणि मोरेश्वर ला वैताग आला आता गावाला कसे जायचे या विवंचनेत त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि महामार्गावरील झाडाला गळफास लावून त्याने जीवनयात्रा संपविली. सदर घटनेची माहीती मुलांने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितली तेव्हा पोलिसांनी मोटेगाव येथे फोन करून माहिती दिली. आणि ही बातमी येताच मोटेगाव सहित सर्वत्र परिसर शोकसागरात बुडाला आणि बापलेकांचा शोध थांबला.

.    नियतीसमोर कुणाचेही चालत नसते असे म्हटले जाते. त्याप्रमाणे मोरेश्वर च्या जीवनात प्रत्यय आला आहे. मोटेगाव येथील मोरेश्वर सोनवाने आणि मुलगा सागर हे दोघेही दि 24 फ्रेब्रु ला पत्नी मजुरीला गेली असता तिच्या मागें तिला न सांगताच कुंभ मेळाव्याला प्रयगराज ला निघून गेले. आणि तेव्हापासून गावात त्यांचा शोध सुरू झाला. मात्र गोंदिया वरून रेल्वेने प्रवास सुरू करून जबलपूर समोर त्यांच्या दुःखदायक प्रवासाला सुरवात झाली. काही अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने त्यांची बॅग हिसकावून चोरून नेली कसे तरी प्रवास करून प्रयगराज गाठले. गंगा नदीत शाही आंघोळ करून पलीकडील दुसरे तीर गाठले. मात्र पैसे नसल्याने त्यांच्या समोर मोठा डोंगर उभा झाला. तेव्हा मुलाच्या कानातील बारी विकून तीन हजार रुपयात पुढील प्रवास सुरु केला.

.    वाराणशी येथे येऊन पुढील मार्गाने जावे. मात्र इथेही नियती आडवी आली गुंड लोकांनी धमकावून त्यांचे पैसे काढून घेतले. तसेच मोबाईल सुद्धा घेतला. आता काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आणि मोरेश्वर यांचा मानसिक संतुलन बिघडले आणि दोघेही बाप लेक वाराणशी च्या रस्त्यावर फिरू लागले. रात्र झाली की कुठेही उघड्यावर झोपायचे कुणी देईल ते अन्न खायचे कुठलाही पाणि प्यायचे असा नित्यक्रम मागील 43 दिवस बाप लेक यांचा सुरू होता. या दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुलगा गावाकडे जायचा हट्ट करीत होता. तर बाप पैसे नसल्याने मौका मिळाल्यावर गावाला जाऊ असे मुलाला सांगत होता. पण मुलगा पोलिसात जाऊन त्यांना सांगू असे बोलीत होता. मात्र बाप पोलीस आपल्याला कारागृहात टाकतील असे सांगून टाळत होता. इकडे गावकरी बापलेकांचा शोध घेत होते. समाजमाध्यमावर त्यांचे फोटो टाकून माहिती मागत होते. मात्र त्यांचा शोध लागला नाही.

.     मध्यंतरी त्यांचा फोन गावात आला होता. जबलपूर येथे आहोत तेव्हा गावातून चंदू रामटेके आणि काहीजण तिथे गेले. मात्र त्यांचा शोध घेतला पण मिळून आले नाही. तेव्हा परत गावाला आले तेव्हापासून त्यांचा शोध लागला नाही. अखेर 43 दिवसानंतर वाराणशी पोलीस ठाण्यातुन फोन आला की आपला मुलगा सुखरूप आहे. तेव्हा चंदू रामटेके, विलास कोराम, संजय सोनवणे, यशवंत अडसोळे आणि मुलाची आई व नातलग वाराणसी ला गेले. पोलीस स्टेशन गाठले तेव्हा त्यांना वेगळीच घटना डोळ्यासमोर दिसली. मोरेश्वर यांनी झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली होती. सदर बातमी गावात कळताच गावात एकच कल्लोळ माजला संपुर्ण गावकरी हळहळ व्यक्त करीत शोकसागरात बुडाला तेव्हा मुलाने सांगितले की दि 8 एप्रिलला बाबा महामार्गावरील झाडावर चढले आणि फाशी लागतो असे बोलले तेव्हा मी तात्काळ जवळील पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल व्हायच्या पूर्वीच बाबा निघून गेले. अशी मोरेश्वर यांची करून आणि हृदयाला पाझर फोडणारी कहाणी आहे. नियतीने मोरेश्वर यांचे प्राण घेतले असे म्हणायला हरकत नाही. वाराशिवणी नदीघाटावर मोरेश्वर यांचे अतिंमसंस्कार पार पाडून नातेवाईक आणि गावकरी मुलाला घेऊन घरी परत आले.

.     आधीच अठराविश्वव दारिद्र्य कुटुंबाची परिस्थिती असल्याने मोरेश्वर निघून गेल्याने आता कसे जीवन जगावे हा मोटा प्रश्न मोरेश्वर यांच्या पत्नी समोर आला आहे. दोन मुलाचा सांभाळ कसे करावे हे दुःख घेऊन ती हरवल्यासारखी उभी आहे. तेव्हा शासनाने तिच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.