- दोन लाखाचे नुकसान
- तळेगाव पोस्ट येथील घटना
वरोरा : रब्बी हंगाम संपत आला असून अनेक शेतकर्यांनी शेतपिके कापून शेतातच ढीग मारून ठेवला मात्र सोमवारी पहाटे च्या सुमारास वरोरा तालुक्यातील तळेगाव पोस्ट शेतशिवारात असलेल्या शेतकर्यांच्या ढीगार्यावर वीज पडल्याने शेतकर्याचा माल जळून राखरांगोळी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस झाली. या घटनेत शेतकर्यांचे २ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे शेतकर्यांकडून सांगितले जात आहे.
. रविवारी सायंकाळ पासूनच वातावरणात बदल झाला. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकर्यांनी रब्बी हंगामातील गहू, चणा, ज्वारीची फसल जमा करून शेतातच ढिगारे मारून ठेवले होते. मात्र अचानक सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास शेतातील ढीगार्यावर वीज कोसळली. यात संपूर्ण माल जळून खाक झाला. तळेगाव पोस्ट येथील शेतकरी अजाब तिखट, गुलाब तिखट, निखिल तिखट यांचे सर्वे नंबर ५८ मधील 20 पोते चणा, 10 पोते गहू, 8 पोते ज्वारी जळून खाक झाल्याने अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या हातात आलेला माल वीज कोसळल्याने जळून खाक झाला. महसूल व कृषी विभागाने तात्काळ शेतकर्यांच्या शेतात जाऊन मोका पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. या नुकसानीने शेतकर्यांना पीक कर्ज भरणे कठीण होणार आहे. त्यामुळे शासनाने या नुकसान ग्रस्त शेतकर्यांना कर्ज माफी देण्यात यावी. किशोर डुकरे, शेतकरी नेता, वरोरा