आज पासून धावणार नंदीग्राम एक्सप्रेस

56
  • आता दररोज करता येणार बल्लारपूर ते मुंबई प्रवास
  • रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळाल्याने दिलासा

विसापूर : बल्लारपूर ते मुंबई दरम्यान थेट रेल्वे असावी म्हणून प्रवाशांची मागणी होती.रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली. शनिवार दि. १६ मार्च पासून नंदीग्राम एक्सप्रेस सकाळी ८.30 वाजता सुटणार असून ती मुबंईला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.00 वाजता पोहचणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.आता जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दररोज बल्लारपूर ते मुंबई रेल्वेचा प्रवास घडणार आहे.

.     मध्य रेल्वे प्रशासनाने या संदर्भात वेळापत्रक जाहीर केले,असून बल्लारपूर ते मुंबई थेट रेल्वे सुरु झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नंदीग्राम एक्सप्रेसचा मार्ग माजरी, आदिलाबाद, किनवट, नांदेड, औरंगाबाद असा राहणार आहे. मात्र रेल्वे प्रवाशांची मागणी बल्लारपूर ते मुंबई रेल्वेची वर्धा मार्गानी होती. परंतु काही अडचणीमुळे सदर रेल्वे सेवा मिळाली नाही. पूर्वी लिंक एक्सप्रेस बल्लारपूर येथून धावत होती. ती कोरोना काळात बंद पडली.तेव्हापासून बल्लारपूर ते मुंबई थेट रेल्वे सेवा देण्याची मागणी केली जात होती.