नेरी : नुकत्याच झालेल्या सततधार पावसाने नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथील सत्यवान उईके, घनश्याम सहारे, देवराव चौधरी, यांचा घरे कोसळल्याने फार मोठे नुकसान झाले आहे.
. चिमूर तालुक्यात मागील पाच दिवसांपूर्वी झालेल्या सततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे या पावसाने शेत पिकांचे तसेच अनेक घरांचे नुकसान झाले आहे यात बोथली येथील सत्यवान उईके, घनश्याम सहारे, देवराव चौधरी यांचे घर भुईसपाट झाले. तेव्हा शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.