वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाची हत्या

39

उसनवारी च्या पैश्यातुन दोन गटात वाद  : एकाची हत्या एक गंभीर

         ५ आरोपी अटकेत         :         बल्लारपूर येथील घटना         

बल्लारपूर

.             उधारीचे पैसे मागण्यावरून दोन गटात वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी दोन युवक मध्यस्ती करू लागले. भांडणात मध्यस्ती केली म्हणून मध्यस्ती करणार्‍या युवकांनाच मारहाण करण्यात आली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दूसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.६ नोव्हेंबर ला रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान बल्लारपूर शहरातील विद्या नगर वॉर्ड पंचशील चौक येथे घडली. ललित तोडसाम (३७) रा.पंचशील चौक, विद्या नगर वार्ड असे हत्या झालेल्या युवकांचे नाव आहे. यात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

.             पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की चैतन्य समुद्रवार याची बहीण आकांक्षा हिने आरोपी शितल रितीक गवई यास काही दिवसा अगोदर उसनेवारी पैसे दिले होते. पैसे वापस करण्याची वेळ आल्यानंतर पैसे परत न केल्याने आरोपी शितलला शिवीगाळ करीत वाद झाला. शितल चा पती रितीक गवई याने पैसे मागितले म्हणून अश्लील शिवीगाळ करीत झटापट करीत असल्याने मृतक ललित तोडसाम व जखमी अमोल देवगडे यांनी शितल चा पती रितीक गवई याला समजवून घरी पाठविले. रितीक ने त्याची आई आशा गवई हिला वाद झाल्याचे सांगितले तेव्हा आशा गवई हिने शेजारी राहणाऱ्या सौरभ खान याला घेऊन घटनास्थळी पोहचले व तुम्ही रितीक ला का मारले असे म्हणून पाचही आरोपीने संगनमत करून काठी, दगड, नालीचे सिमेंट चे तुकडे यांनी मारले. हाणामारीत मधात सोडवण्यासाठी गेलेल्या ललित तोडसाम याचा मृत्यू झाला आणि अमोल देवगडे हा जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. करण्यात आले.

.             यात मध्यस्थी गेलेला युवकाचा जीव गेला असून आरोपी रितीक भीमराव गवई (२२), सौरभ खान हाजी अब्दुल सुभान खान (३५), आशा भीमराव गवई (४५), शितल रितीक गवई (२०) सर्व राहणार ग्रामीण रुग्णालय चे मागे, शांती नगर, बालाजी वॉर्ड बल्लारपूर, बंडू पांडुरंग नगराळे (४७) रा. पंचशील चौक विद्या नगर वॉर्ड बल्लारपूर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे